Breaking News

पर्यटना बरोबरच शेती सिंचनासाठी लवकरच उतावळी नदी बहुळाला जोडणार - आमदार किशोर आप्पा पाटील

 


पर्यटना बरोबरच शेती सिंचनासाठी लवकरच उतावळी नदी बहुळाला जोडणार - आमदार किशोर आप्पा पाटील               नांद्रा ता पाचोरा. ( प्रतिनिधी-प्रा यशवंत पवार )*                                       बिल्दि येथील बहुळा धरणालगत असणाऱ्या सुमारे चार -पाच एकर मध्ये पाच कोटी रुपयांचा काही दिवसापूर्वी नामकरण केलेल्या कृष्णा सागर पार्कचा   भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शुभ हस्ते दि.20फेब्रुवारी सोमवार रोजी संपन्न झाला

याप्रसंगी व्यासपीठावर प्रांताधिकारी डॉ.विक्रमजी बादल, तहसीलदार कैलास जी चावडे,माजी जि प सदस्य रावसाहेब पाटील, माजी जि प सदस्य मधुभाऊ काटे, माजी जि प सदस्य पदमसिंह पाटील,कार्यकारी अभियंता जळगाव प्रशांत कुमार येळाई,सार्वजनिक विभागाचे डी एम पाटील,एस एस पी कंट्रक्शन संजय शांताराम पाटील,मार्केट कमिटीचे शिवदासतात्या,स्व.के.ए म बापू यांचे सुपुत्र अनिलदादा पाटील व नातू, अनिल धना पाटील, माजी प. स.सदस्य पंढरीनाथ अण्णा पाटील, माजी जी नगराध्यक्ष

संजयजी गोहिल,माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, राजेंद्र तायडे नंदू सोमवंशी,योगेश पाटील, इंजिनीयर नंदकुमार शेवाळे ,राम केसवानी, माजी प. स सदस्य सुभाष मुंडे, चंद्रकांत धनवडे गणेश पाटील, सुभाष तावडे, शिवाजी तावडे,

बिल्दी सरपंच निलेश पाटील व्यासपीठावर उपस्थित होते याप्रसंगी सूत्रसंचालन पत्रकार प्रवीण ब्राह्मणे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये माजी जि प सदस्य रावसाहेब पाटील यांनी केले याबरोबरच तहसीलदार कैलासजी चावडे साहेब यांनी बोलताना सांगितले की आमदार साहेब किशोर आप्पांनी स्वर्गीय केएम बापूंचे नाव या ठिकाणी  या पर्यटन स्थळला देऊन मनाचा केलेला मोठेपणाला लोक कायम स्मरणात ठेवतील याविषयी त्यांचे अभिनंदन केले  त्यानंतर या संपूर्ण पर्यटन स्थळाचा आर्किटेक प्लॅनिंग वर्मा साहेब यांनी समजावून सांगितला त्यामध्ये नैसर्गिक वातावरणात व संपूर्ण लेव्हल

करून,पेविंग ब्लॉक ,हॉर्टिकल्चर,  लँडस्केपिंग गार्डन ,  वॉटर फॉल फाउंटन,एक सुंदर अशी चौपाटीची व्यवस्था तेथे खाणेपिणीचे स्टॉल  आणि एक मॉडर्न असं टॉयलेट एकत्रित हा पूर्ण साडेतीन ते चार एकर मध्ये प्रोजेक्ट आपण डिझाईन केलेला असल्याचे सांगितले त्याबरोबरच मधुभाऊ काटे यांनी या पर्यटनास्थळाची स्तुती करून अजून 20 ते 25 कोटी अतिरिक्त निधी आमदार साहेबांनी आणून जामनेर पेक्षा भव्य दिव्य पर्यटन स्थळ येथे करावे असे मागणी केली यावेळी नांद्रासह, आसनखेडा,सामनेर, पहाण  शेतकऱ्यांनीही पोट चाऱ्यांचा  प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार साहेबांना साखळे घातल्यानंतर अध्यक्षीय भाषणात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पर्यटना बरोबरच या ठिकाणी शेतीसिंचनालाही मुबलक पाणी मिळावे यासाठी परिसरातील खेड्यातील शेतकऱ्यांच्या कॅनल व पोटचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावून जेव्हा हे पर्यटन स्थळ उद्घाटन होईल तोपर्यंत मी अगोदरचा प्रलंबित असलेला उतावळी नदी बहुळा धरणाला जोडण्याचं 2007  ला केएम बापूंचे जे स्वप्न होतं ते मी निश्चित पूर्ण करणार

असल्याचे सांगितले या ठिकाणी अजून स्वर्गीय के. एम.बापू यांचा स्टॅचू व श्रीकृष्ण भगवान यांचा ही स्टॅचू बनवून कोकणाच्या धर्तीवरील सुंदर झाडे वेली,बागा निर्माण करून त्यासाठी अजून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून 20 ते 25 कोटी रुपये पुढील काही वर्षात आणण्याचे घोषणा केली याबरोबर शिवजयंती निमित्त प्रत्येक गावांना शिवस्मारकसाठीही तीन लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली याबरोबरच मत्स्यमारींसाठी मत्स्य पूरक व्यवसाय व बोटिंग व्यवस्था कशी करता येईल याविषयी योजना आणण्याचे सांगितले याप्रसंगी कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन माजी नगरसेवक गणेश पाटील यांनी केले यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ,शेतकरी, शिवसेना पदाधिकारी, अधिकारी, सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,शिवसैनिक व पत्रकार बांधव उपस्थित होते

No comments