Breaking News

300 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या मायजी देवी यात्रोत्सवाला दि.13 जाने.पासून प्रारंभ


300 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या मायजी देवी यात्रोत्सवाला दि.13 जानेवारी पासून प्रारंभ*. 

वरसाडे व मायजीदेवी पादुका पालखी सोहळ्याचे पूजन होणार आमदार किशोर पाटील सपत्नीक यांच्या शुभहस्ते* 

वरसाडे ते माहेजी पादुका पालखी सोहळा दि. 12 जाने रोजी सकाळी 5.वा 

माहिजीदेवी पादुका पालखी सोहळा दिनांक १३ जानेवारी सकाळी 5. वाजता

 तीन नामवंत बँड दोन दिवशी देणार पालखी सोहळ्याला सेवा*

 यात्रेच्या अनुषंगाने नांद्रा माहिजी रस्त्याचे काम थातुर्मातुर डागडूगीने,वाहन चालक हैरान* 

नांद्रा येथील कवी स्वप्नील बाविस्कर यांची मायजी माता वर काव्यरचना 

नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी) 

( प्रा.यशवंत पवार)

ऐतिहासिक परंपरा

तीनशे वर्षाची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक माहिजी देवी यात्रेला पौष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच दिनांक 13 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे सालाबादप्रमाणे यावर्षीही नवस, जाऊळ, निमसाळा  देवीला नवसाला पावण झाल्यामुळे नवस फेडण्याची प्रथा आजही भाविक वर्गातून सुरू आहे या ऐतिहासिक माहीजी देवीची पादुकां पूजन व पालखी सोहळा व भव्य मिरवणूक दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी 5.वा. आमदार किशोर आप्पा पाटील व सौ सुनीताताई किशोर पाटील सपत्नीक यांच्या  शुभ हस्ते  पूजन होणार आहे, गिरणा तीरावर असलेले या मंदिराला एरंडोल तालुक्याला जोडण्याचे काम आतापर्यंत एका होडीने सुरु आहे  परंतु आता त्या ठिकाणी भव्य असा पूलही मंजूर झाला असून त्यामुळे धुळे जळगाव जिल्ह्याचा अंतर कमी होणार आहे म्हणून या दोन तालुक्यांना जोडण्याचा काम करणाऱ्या या पुलाच्या अनुषंगाने पुढे धुळे मुंबई महामार्ग हि भविष्याच्या दृष्टिकोनातून बाजारपेठेसाठी दळणवळणासाठी सोयीस्कर होणार आहे.या गिरणा नदीवर या ऐतिहासिक मायजी देवीच्या पर्यटन तीर्थक्षेत्र  मंजूर होण्यासाठी ही विशेष प्रयत्न सुरू आहेत तसेच काही दिवसापूर्वीच या भव्य मंदिराचा कलश स्थापना कार्यक्रम संत - महंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यामुळे आता संपूर्ण मंदिराची शोभा ही वाढली असून ते ऐतिहासिक जागृत देवस्थान ही निर्माण झाले आहे या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त नवसाला पावण होणारे देवी म्हणून या ठिकाणी नवस मानून व फेडण्यासाठी येत असतात  या ठिकाणी उद्योग व्यवसायात, गृहशांती, प्रपंच व कौटुंबिक सुख,लावावे म्हणून भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी पौष पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर येऊन आपली मनोकामना पूर्ण करतात व नवस फेडतात यात्रेला ऐतिहासिक महत्व असून शेकडो वर्षांपूर्वी ही यात्रा बारा महिने चालत होती  या गावाला अगोदर चिंचखेडा असे संबोधले जायचे परंतु तत्कालीन वेळी देवीचा साक्षात्कार झाला व देवी माय प्रकटली म्हणून मायजी हे नाव पडले

 या यात्रेदरम्यान मोठी वर्दळ असलेला नांद्रा मायजी रस्त्याची डाग डुगी योग्य होणे गरजेचे, 

* सध्या बऱ्याच रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून त्यावर फक्त जाडखडीचा तर टाकून तात्पुरती थातूरमातूर डागडुगी केल्याचे निदर्शनात येत असून ती योग्य पद्धतीने होण्याची ही मागणी वाहन चालक करत आहे

 *आख्यायिका 

अशी आहे की महिजी देवी व त्यांची लहान बहीण गावात येत असताना लहान मुलांनी बघितले व तिला वेडसर म्हणून देवीला त्यांनी हि नवले यामुळे माहिजी देवीने तिच्या तीक्ष्ण नजरेने त्या मुलांकडे बघितले त्याच वेळेस ते मुलं मुरचीत येऊन पडले   ही बातमी गावातील लोकांना कळल्यानंतर भाविकांनी देवीला विनंती केले तेव्हा देवीने पुन्हा  त्यांना शुद्धीवर आणले व काही पावलावरच त्या जाता जाता दोघ बहिणी अदृश्य झाल्या,कालांतराने त्या ठिकाणी त्या जागेवरच त्रिशूल व बाण निघाले त्यावरून माय प्रकटली असे लोकांची समज व श्रद्धा झाल्यामुळे तेथे लोकांनी जीर्णोद्धार करून देवीचे मंदिर साकार केले यानंतर मायचे गाव म्हणजे मायजी असे या गावाला संबोधण्यात येऊ लागले कालांतराने अपभ्रंश होऊन मायजी चे माहिजी असे नाव झाले अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे व त्याच देवीच्या नावावरून इंग्रज राजवटी पासून नांद्रावरून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर व कुरंगी येथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे स्टेशनला,चार किलोमीटर अंतर असणाऱ्या माहिजी या गावाचे नाव देण्यात आले 

पालखी सोहळा

 गेल्या दहा वर्षापासून     माहीजी येतील गावातील भक्तगण यांनी सुरू केलेल्या माहीजी देवीच्या पादुका, पालखीची मिरवणूक व पूजन पौष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच या वर्षी दिनांक 13 जानेवारी सकाळी पाच वाजल्यापासून संवाद,टाळ मृदंगाच्या गजरात संपूर्ण गावातून भव्य अशी मिरवणूक निघते यादरम्यान संपूर्ण गावात दारांवर सडा,रांगोळी, घरांवर गुढी, पताका,झेंडे, उभारून गावासह परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होत असते दरवर्षी नामवंत बँड देवींच्या गाण्यांचे सवाद्य मिरवणुकीसाठी लावण्यात येत असतात त्या अगोदर  पौष पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजेच 12 जानेवारी ला वरसाडे येथूनही माहिजी देवीच्या पादुका पालखी सोहळा सालाबादा प्रमाणे काढण्यात येणार आहे या पादुका व पालखी सोहळ्याचे पूजनही आमदार किशोरआप्पा पाटील व सौ ताईसो सुनिताताई किशोर आप्पा पाटील यांच्या सपत्नीक शुभ हस्ते होणार आहे त्या ठिकाणीही तीन बँडवर संवाद्य भव्य मिरवणूक वरसाडे ते माहिजी काढण्यात येणार आहे त्या अगोदर माध्यमिक विद्यालय नांद्रा येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सुंदर लेझीम पथक सुद्धा या ठिकाणी आपला कलाविष्कार दाखविणार आहे व  यावर्षी देवीची सेवा दरवर्षी नित्यनेमाने भगत कुटुंबात बदलत असते यावर्षी सेवेचे मानकरी म्हणून दत्तू दशरथ भगत,अण्णा दशरथ भगत यांच्या कुटुंबला देण्यात आली आहे , मंदिर परिसरात होम, हवन, सत्संग,देवी चे भजन, व रात्री कीर्तनाचे कार्यक्रम असतात या यात्रेला भाविकांची विशेष सोय ग्रामपंचायत कमिटी सरपंच उपसरपंच यांच्यासह सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील  व ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात येते यात्रादरम्यान चोरी चपाटी,मुली व महिलांची कुठल्याच प्रकारची अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौक बंदोबस्तासाठी छावणी टाकून पाचोरा तालुक्यातील पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाने बीट हवालदार,पोलीस विभागातर्फे  प्रशासन चौक बंदोबस्त करत असतात

मायजी माता वर कवी स्वप्निल बाविस्कर यांची काव्यरचना





No comments